नेवासे तहसिल कार्यालयात होणार शेतकरी संघटनेचे ढोल बजाव आंदोलन… अशोक मेजर काळे
नेवासे तहसिल कार्यालयात होणार शेतकरी संघटनेचे ढोल बजाव आंदोलन
नेवासे तहसिल कार्यालयात होणार
शेतकरी संघटनेचे ढोल बजाव आंदोलन
======================🥁🥁🥁🪘🎷🎷🎺🎺🎺🪗🎸🎸🎻🎻🥁🥁🥁🎹
=======================
नेवासा (प्रतिनिधी) – खरीप 2023 च्या पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्या कारणाने नेवासा तालुका शेतकरी संघटनेतर्फे तहसील कार्यालय व कृषी कार्यालय येथे 4 ऑक्टोबर 2024 रोजी ढोल बजाव आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे .नेवासा तालुका अध्यक्ष मेजर अशोक काळे यांनी सांगितले की शासकीय दप्तर दिरंगाई मुळे नेवासा तालुक्यातील चार मंडळे अगोदरच 25% अग्रिम विमा रक्कम भरपाईस मुकलेली आहेत .परंतु आता शासन निर्णयानुसार 21 दिवसापेक्षा जास्त कालखंड पडल्या कारणाने नेवासा तालुक्यातील आठही मंडळी विम्यास पात्र आहेत .तरी देखील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून केंद्र शासनाचे 99 कोटी व राज्य शासनाचे 1927 कोटी रुपये इतकी रक्कम अनुदान स्वरूपात येणे बाकी असल्याकारणाने आम्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ शकत नाही असे सांगण्यात येत आहे .80 :110 चा फॉर्मुल्यानुसार 110% च्या पुढे नुकसान झाल्यास राज्य शासनाचे व केंद्र सरकारचे अर्थसहाय्य करणे क्रमप्राप्त आहे .परंतु दुसरा खरीप सीजन उलटून गेला तरीही शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत एक रुपया देखील मिळू शकलेला नाही .त्यामुळे झोपी गेलेल्या राज्य सरकारला व केंद्र सरकारला जाग आणण्याकरिता नेवासे तहसील व कृषी कार्यालयासमोर दिवसभर शेतकरी संघटना ढोल बजाव आंदोलन करणार आहे .
नुकताच 1927 कोटी देण्याचा शासन निर्णय झाल्याची बातमी जरी समाज माध्यमात फिरत असली तरी शेतकऱ्याच्या बचत खात्यात मध्ये सदर रक्कम येईपर्यंत फार मोठ्या अडचणी निर्माण केल्या जातात व विलंब केला जातो .त्यामुळे विना विलंब शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित रक्कम प्राप्त व्हावी म्हणून शेतकरी संघटनेने हे पाऊल उचलले आहे
माननीय प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना उपाध्यक्ष विधीतज्ञ अजित काळे साहेब पिक कंपनी अधिकाऱ्यांशी संपर्कात जोपर्यंत विमा मिळत नाही तसेच खात्यात जमा होत नाही तोपर्यंत हा कायदेशीर शेतकरी लढा चालूच राहणार असे व तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात जोपर्यंत पैसा जमा होत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही. त्यांनी आपले मनोगत अशे व्यक्त केले
2022 खरीप च्या वंचित शेतकरी विमाधारकांच्या बाऊन्स चेक42 लाख रुपयांचा परत आणण्याचे यशानंतर शेतकरी संघटनेने 2024ता विमा लवकरात लवकर आणण्यासाठी प्रयत्न चालू केलेले आहेत . शेतकरी संघटना अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष हरी आप्पा तुवर
यावेळी शेतकरी संघटनेची तालुकाध्यक्ष अशोक मेजर काळे उपाध्यक्ष बाबासाहेब नागवडे, युवा आघाडीची तालुकाध्यक्ष डॉक्टर रोहित कुलकर्णी, महिला आघाडी दिपाली शेंडे, संपर्कप्रमुख विश्वास मते, श्री किरण लंघे, सोमनाथ आवटी, तरमाळे गणेश, ज्येष्ठ नेते कैलास पाटील पवार, ज्ञानेश्वर साठे, काळे संतोष नानासाहेब, भाऊसाहेब शिवाजी काळे उर्फ ठाकरे, लंघे अनिल किसन इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. शेतकरी संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र पाटील काळे