अहमदनगरआरोग्य व शिक्षणनिवडणूकपंचनामाब्रेकिंगराजकियसंपादकीय
सावकार व्यापाऱ्यांचे देणे थांबले यामुळे सर्वसामान्य जनता किंवा शेतकरीच अडचणीत आले नसून व्यापारी ही अडचणीत आले आहेत.
तुम्हाला खरंच सर्वसामान्य जनतेचा व शेतकरी बळीराजा व व्यापाऱ्यांचा पुळका असेल तर,खरंच आज अशी वेळ आली आहे की शेतकरी "कर्जमुक्तच" झाला पाहिजे.त
0
2
6
4
8
6
संपादकीय
शेतकऱ्यांचे मार्गदर्शक विधीतज्ञ अजित काळे साहेब यांच्या प्रेरणेतून आणि विचारातून
संपादकीय : सावकार व्यापाऱ्यांचे देणे थांबले यामुळे सर्वसामान्य जनता किंवा शेतकरीच अडचणीत आले नसून व्यापारी ही अडचणीत आले आहेत. त्यांच्याही धंदे जवळ संपुष्टात आले आहेत.तेही कर्जबाजारी झाले आहेत.याला सर्वशी फक्त आणि फक्त आपणच जबाबदार आहात.तुम्हाला खरंच सर्वसामान्य जनतेचा व शेतकरी बळीराजा व व्यापाऱ्यांचा पुळका असेल तर,खरंच आज अशी वेळ आली आहे की शेतकरी “कर्जमुक्तच” झाला पाहिजे.तरच शेतकरी बळीराजासह, बाजार,व्यापार पेठ इतर सर्व काही सुरळीत होईल! नुसत्याच मतासाठी कुठल्याही योजना आणू नका.जनतेने तुम्ही मागील सहा सात वर्षात काय पराक्रम केले आहेत,काय दिवे लावले आहेत हे सर्व काही पाहिलं आहे, ओळखलं आहे.जनता एवढी दूधखुळी नाही.हे आपण विसरू नका,त्यांनी तुमच्या रात्रीचा खेळ पाहिला,तुमचा पहाटचा खेळ पाहिला,तुमचा दिवसाचा खेळ पाहिला,तुमची खोके पाहिले,तुमची डबे पाहिले, तुमच्या हॉटेल पाहिल्या,तुमची डोंगर पाहिली,तुमची झाडी पाहिली,तुमची ऐडी पाहिली.अजून किती वेडात काढणार आहात सर्वसामान्य जनता व बळीराजाला?तुमची भीक नको आहे आम्हाला,आम्ही आमच्या पिकवलेल्या मालाला हमीभाव द्या,स्वामीनाथन आयोग लागू करा.तुमच्या राजकीय स्वार्थापोटी व गनिमी काव्यामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना हाताला काम नाही,त्यामुळे ते बेरोजगार झालेली आहेत, काही व्यसनाधीन झाले
आहेत,त्यामुळे मुलांची वय 30 ते 40 पर्यंत गेली आहे.तरी त्यांचे लग्न जमेना,त्यांना कोणी मुली देईना,अजून किती तळतळाट घेणार आहात आपण?विचार करा अजूनही वेळ गेलेली नाही प्रत्येक गोष्टीला अंत असतो, शेतकऱ्यांच्या मुलांना शेती कामासाठी सर्व हत्यारे वापरायची सवय झालेली आहे.त्यांचा संयम तुटू देऊ नका.कारण आपल्याला संरक्षण देणारी कोणत्याही राजकीय नेत्याची मुलं सैन्यात, पोलीस दलात व इतर ठिकाणी नाही हे विसरू नका.ती शेतकऱ्यांचीच मुलं आहेत,आज सर्वात जास्त आशावादी असेल तर शेतकरी आहे.त्याला वाटतं या पिकात नाही मिळालं तर दुसऱ्या पिकात मिळेल त्याच्यासारखी सहनशीलता आज कुणाकडेही नाही.आपली जरा एक वर्ष खुर्ची गेली तर आपल्याला पार असह्य होतं, मुळव्यादापेक्षाही जास्त वेदना होतात,आपल्या बुडाला पार मुगंळे लागतात.तेव्हा त्यांची सहनशीलता संपू देऊ नका.शेवटी त्याचंही स्वप्न असतं, घर बांधू,बंगला बांधू,मुला मुलींची शिक्षणं करू,थाटामाटात लग्न करू,आई-वडिलांना सुखात ठेवू, आपल्याला जशी सत्तेची नशा असते ना ती नशा त्यानांही असते.परंतु ती माफक असते. त्याच्यासाठी त्यांनी आपल्यापेक्षा दिवसरात्र, रात्रीचा दिवस करून अपार कष्ट,ढोर मेहनतीच्या जोरावर हे स्वप्न बाळगलेलं असतं.अजूनही विचार करा,भविष्य अवघड आहे, शेतकऱ्यांची व सर्वसामान्यांची विचारक्षमता शांततेची होती व आहे.परंतु प्रत्येकाला भावना व स्वप्नं असते.नाहीतर तरुण रक्त आणि घ्या ऊक्त असं व्हायला नको.त्या तरुण मुलांचा जर उद्रेक व त्यांच्या स्वप्नांचा जर चुराडा झाला तर थोड्याच दिवसात परिस्थिती हाता बाहेर गेलेली असेल.तीच हत्यारे दुसरीकडे वापरण्याची वेळ येऊ देऊ नका.नाहीतर भविष्य अवघड आहे,पुढील पिढी आपणास रस्त्यानेही चालू सुद्धा देणार नाही. सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्या मुलांनांही विचार करण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही जरा एकमेकात विचार ठेवला तर तुम्हाला संधी आहे,नाहीतर तुमचेही भविष्यं अवघड आहे. कारण पहिली निजामशाही, आदिलशाही,बादशाही,पेशवाई होती.आता तीच परिस्थिती प्रत्येक राज्यात,जिल्ह्यात,प्रत्येक तालुक्यात तयार झालेली आहे.आजा गेला,मुलगा आला,मुलगा गेला,नातू आला,नातू गेला पणतु आला,असं जर चक्र चालू राहिलं तर तुम्हाला संधी कधी मिळेल.तेव्हा सर्वसामान्यांनी आपल्या भविष्यासाठी मतभेद विसरून एकत्र येऊन विचार करा. हे लोक तुमच्यातच वाद लावून आतापर्यंत एकमेकाची डोके फोडून तुमच्या जीवाशी खेळत त्यांनी त्यांची पोळी आजपर्यंत भाजली आहे.ही लोक नवीन नेतृत्व कधीही तयार होऊन देत नाहीत, त्यामुळे मोठमोठी भ्रष्टाचाराची आगारं तयार झालेले आहेत. शासनाकडून सर्वसामान्य साठी मिळत असलेले रस्ते, पुलं,शाळा,इमारती,दवाखाने, व इतर अनेक कामात करोडोने भ्रष्टाचार होत आहे,त्यांना मोठा करण्याकरता व सहकारी संस्था,शाळा,कॉलेजे उभ्या करण्याकरता सर्वसामान्यांनी आपल्या संसाराची होळी करून खाजगी सावकार,व्यापारी, सोसायटीकडून,आया बहिणींच्या गळ्यातील दाग दागिने,मनीमंगळसूत्र,धनधान्य, चाऱ्याच्या गंजा सहित विकून यांना सहकारी संस्था उभा करण्यासाठी मदत करून मोठं केलेलं आहे.ते आज संपूर्णपणे विसरलेले आहेत. सर्वसामान्यांना त्यांच्यापासून कुठलाही प्रकारचा दिलासा किंवा सहाय्य मिळत नाही.त्यामुळे ग्रामीण भागात आजही कुठल्याही प्रकारचे रस्ते,शाळा,पाणी,विज व इतर विविध प्रकारच्या सुविधा मिळत नाही,हा विचार आपण कधी करणार आहात का नाही.सर्वसामान्य आणि सर्वसामान्यांसाठी एकत्र येऊन लढा द्या.व सर्वसामान्यतूनच नेतृत्व तयार करा, तरच आपला विकास होईल. घराणेशाहीला आणि हुकूमशाहीला तिलांजली द्या हीच आपल्यातील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आपल्या बांधवांची हाक आहे.आपलाच
नेवासा ता
लुका शेतकरी संघटना ,तालुका नेवासा.अभी नही तो कभी नही! विचार करा.राम कृष्ण हरी.🙏🙏*
0
2
6
4
8
6