शेतकरी करणार सोसायटीचा कर्जमाफीचा ठराव -ऍड.पांडुरंग औताडे*
महाराष्ट्र हे सहकाराने घडवलेले समृद्ध एक नंदनवन सहकाराची मुहूर्तमेढ अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दूरदृष्टीचे असलेले सहकार पंडितांनी लावली. सहकार पंढरीला बदनाम करून खाजगी लोक उभे राहिले देखील परंतु त्यांचा सामान्य शेतकऱ्यांना प्रचंड त्रास झाला सहकार सोसायटी म्हणजे सामान्य माणसाच्या मुलाबाळाच्या लग्नासाठी उभा राहणारी हक्काची सोसायटी कोणी दवाखान्यात असेल तर चेअरमन डोळे झाकून सह्या करणार आणि अहिल्यानगरची सहकार बँक अधिकारी बारीक-सारीक नियमावली न पाहता तात्काळ पैसे हातावर ठेवून शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणार गावाच्या सोसायटीचे चेअरमन पद

*शेतकरी करणार सोसायटीचा कर्जमाफीचा ठराव -ऍड.पांडुरंग औताडे*
नेवासा प्रतिनिधी महाराष्ट्र हे सहकाराने घडवलेले समृद्ध एक नंदनवन सहकाराची मुहूर्तमेढ अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दूरदृष्टीचे असलेले सहकार पंडितांनी लावली. सहकार पंढरीला बदनाम करून खाजगी लोक उभे राहिले देखील परंतु त्यांचा सामान्य शेतकऱ्यांना प्रचंड त्रास झाला सहकार सोसायटी म्हणजे सामान्य माणसाच्या मुलाबाळाच्या लग्नासाठी उभा राहणारी हक्काची सोसायटी कोणी दवाखान्यात असेल तर चेअरमन डोळे झाकून सह्या करणार आणि अहिल्यानगरची सहकार बँक अधिकारी बारीक-सारीक नियमावली न पाहता तात्काळ पैसे हातावर ठेवून शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणार गावाच्या सोसायटीचे चेअरमन पद म्हणजे आर्थिक नाड्या हातात प्रचंड मान आणि सन्मान या पदाला होता अलीकडे मात्र वक्रदृष्टी पडली ती ह्या सहकार क्षेत्रातील सोसायटीवर सोसायटीचा चेअरमन म्हणजे बुडीत खात्याचा चेअरमन अशीच काही परिस्थिती अलीकडच्या काळात ओढवली आहे काही सहकार सोसायटी याला अपवाद असतील देखील परंतु सत्तेसाठी सर्व काही आणि शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट आणि उगवलेला सूर हे एक महत्त्वाचे कारण यामध्ये ठरत आहे शेतकरी कर्जमाफीची घोषणा प्रत्यक्षात मात्र शंभर टक्के कधी उतरली नाही परंतु थोड्याफार प्रमाणात का होईना सहकार सोसायटीच्या शेवटचा घटक म्हणजे गावच्या सोसायटी या सोसायटीच्या अर्थकारणाला घरघर लागली ती म्हणजे कर्जमाफीच्या घोषणेने राजकीय षडयंत्रात सगळ्यात महत्त्वाची गुरफटली गेली ती म्हणजे सोसायटी आज अनेक मातब्बर या सहकाराच्या जीवावर राजकारणात असली तरी वाचवण्यासाठी प्रयत्न करू शकत नाही त्यांना राजकीय अडचणी आहेत शेतकरी कर्जमाफी म्हणजे अत्यावश्यक गोष्ट ती देणे आवश्यक असताना आश्वासन दिले जातात यामध्ये ना कधी तारीख आहे ना कधी वेळ यामुळे प्रचंड अडचणीत आले ती ग्रामीण व्यवस्था आणि म्हणूनच गावागावांमध्ये सहकार सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा चालू असताना जागृत सभासदांनी कर्जमाफीचा ठराव करून या सर्वांसाठी सरकार जबाबदार आहे असे स्पष्ट लिहावे सर्व सन्माननीय चेअरमन आणि संचालक यांनी देखील याला सहमती दर्शवायला हवी कारण कर्जमाफी झाली तर आर्थिक राजकारणाचा गाडा रुतलेला पुन्हा एकदा चालू होणार आहे सर्व जागृत सभासद बंधू आणि भगिनींनो तुम्हाला नम्र आव्हान आहे आता वेळ आहे वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वांनी एकमुखाने संपूर्ण कर्जमाफीचा ठराव करावा यामध्ये मुख्यमंत्री यांनी स्वतः आश्वासन दिलेले असल्याने सातबारा कोरा आज शेतकरी संपूर्णतः त्या आश्वासनाकडे डोळे लावून बसलेले आहे आमच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ पडल्याने त्यासोबत ऊसाला देखील रास्त भाव मिळाला नाही कांदा पिकाची नुकसान झाली या सर्व बाबींचा विचार करता आमच्या शेतकऱ्यांच्या मालकीची असलेली सहकार सोसायटी कर्जाच्या खाईत बुडाली असून त्यांच्याकडे सभासद शेतकरी पैसे भरू शकत नसल्याने आजच्या सभेत संपूर्ण कर्जमाफीचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला असा ठराव सर्व सभासदांनी मागवा असे आव्हान शेतकऱ्यांना करण्यात आले आहे 9890273656
ठराव नमुना:
🏛 सहकारी सोसायटीचा ठराव
ठिकाण : ___________________
दिनांक : ___________________
वेळ : ___________________
वार्षिक सर्वसाधारण सभेचा ठराव
आज दिनांक ______ रोजी आमच्या ____________________ सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीच्या सभागृहात घेण्यात आली. सभेत अध्यक्षपदावर श्री. ____________________ हे विराजमान होते.
सभेत उपस्थित सभासदांनी महाराष्ट्र राज्य शासनाकडून वारंवार जाहीर करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळालेला नाही हे अधोरेखित केले.
परिस्थिती मांडणी :
आमच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ पडल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
ऊस पिकाला रास्त भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
कांदा पिकाची देखील प्रचंड हानी झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम झाला आहे.
त्यामुळे सभासद शेतकऱ्यांकडे सोसायटीचे कर्ज परतफेड करण्याची क्षमता उरलेली नाही.
ठराव :
सदर परिस्थिती लक्षात घेता सर्व सभासदांच्या एकमुखी संमतीने पुढील ठराव मंजूर करण्यात आला :
1. आमच्या सोसायटीतील सर्व सभासद शेतकऱ्यांचे थकीत व बाकी कर्ज शासनाने तात्काळ पूर्णपणे माफ करावे.
2. राज्य शासनाने जाहीर केलेल्या “सातबारा कोरा” करण्याच्या आश्वासनाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी.
3. कर्जमाफी झाल्यास ग्रामीण सहकार सोसायट्या पुन्हा सक्षम होतील व गावकुसातील अर्थकारण सुस्थितीत येईल.
4. या ठरावाच्या प्रती मा. मुख्यमंत्री, सहकार मंत्री व जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात याव्यात.
ठराव मांडणारे :
ऍड. पांडुरंग औताडे
ठरावास अनुमोदन देणारे :
1. श्री. ____________________ (चेअरमन)
2. श्री. ____________________ (उपाध्यक्ष)
3. श्री. ____________________ (संचालक)
4. सर्व सभासद शेतकरी – एकमुखाने
✅ असा अधिकृत ठराव नोंदवून ठेवल्यास तो कायद्याने ग्राह्य धरला जातो आणि शासनाला पाठवल्यावर त्याला अधिक वजन मिळते.
🖊️ नरेन्द काळे




