अखेर आकारिपडीत शेतकऱ्यांचा संघर्ष यशस्वी; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश आणि आंदोलनाची सांगता*
श्रीरामपूर तालुक्यातील आकारिपडीत शेतकऱ्यांच्या संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी आदरणीय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी प्रशासनाला काम थांबवण्याचे आदेश
अखेर आकारिपडीत शेतकऱ्यांचा संघर्ष यशस्वी; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश आणि आंदोलनाची सांगता*
श्रीरामपूर /प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील आकारिपडीत शेतकऱ्यांच्या संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी आदरणीय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी प्रशासनाला काम थांबवण्याचे आदेश देत पुढील कार्यवाही पावसाळी अधिवेशनात निश्चीत करून शेतकऱ्यांना योग्य न्याय दिला जाईल, असे अखिल शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष मा. अजित काळे साहेब यांना स्पष्ट सांगितले.
या आंदोलनादरम्यान अजित काळे साहेबांनी शेतकऱ्यांच्या वेदना आणि तळमळ मंत्री महोदयांसमोर ठामपणे मांडल्या. या प्रकरणात भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, पोलीस प्रशासन आणि सर्व संबंधित यंत्रणांनी सकारात्मक संवादाची भूमिका घेत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले, आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे त्याची पूर्तता करण्याचे वचनही दिले.
या पार्श्वभूमीवर अखेर आंदोलनाची सांगता झाली असून, शेतकरी संघटनेला तात्पुरते समाधान मिळाले आहे. श्रीरामपूर पोलीस प्रशासनाचे विशेष सहकार्य आणि शेतकऱ्यांना दिलेली सन्मानजनक वागणूक याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
अखिल शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष मा. अजित काळे साहेब यांचे नेतृत्व आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे यशस्वी शिष्टाईबद्दल हार्दिक अभिनंदन!
अखेर आकारिपडीत शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन आणि आंदोलनाची सांगता
आकारिपडीत शेतकऱ्यांच्या संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. आदरणीय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्वरित कार्यवाहीचे आदेश देऊन पुढील निर्णय पावसाळी अधिवेशनात होईल आणि शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळेल, असे अखिल शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष मा. अजित काळे साहेब यांना स्पष्ट केले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची सांगता झाली.
✅ शेतकरी हितासाठी आवाज उठवणारे आणि आंदोलनात सहभागी असलेले पुढील शेतकरी बांधव आणि पदाधिकारी विशेष उल्लेखनीय ठरले:
सचिन वेताळ, शरद असणे, बाळासाहेब बकाल, सुनील असणे, बाळासाहेब असणे, डॉ. दादासाहेब अधिक, संजय बाळासाहेब अधिक, बापू गोरे, सतीश नाईक, भारत शिंदे, बाबासाहेब वेताळ, ॲड. घोडे, भाऊसाहेब, जितेंद्र चांदगुडे, दत्तात्रय वेताळ, उत्तम पानसरे, गोरक्षनाथ वेताळ, अभिषेक वेताळ, रामकृष्ण वेताळ, सुरेश टाके, दिलीप गलांडे, डॉ. नितीन असणे, संतोष पठारे, नाईक सर, सुजित बोडके. अनिल अवताडे, श्री चोरमल
कायदेशीर सल्लागार एडवोकेट कावळे भाऊसाहेब त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष तालुका श्री बाबासाहेब नागवडे त्याचबरोबर बाप्पू देशमुख, दादासाहेब नाबादे, ज्येष्ठ नेते दत्तू पाटील निकम , नरेंद्र काळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते