Breaking
ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालदेश-विदेशपंचनामापुरस्कारब्रेकिंगमाहिती अधिकार 2005राजकियशिबिरशेतकरी विरोधी कायदेशेवगाव

बालमटाकळीत शिवजयंती निमित्त व्याख्यान गावचा सरपंच होणे सोपे असते, परंतु पूर्ण गाव सांभाळणे इतके सोपे नाही, 

लोकनियुक्त आदर्श सरपंच श्री भास्करराव पेरे शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात

0 2 6 4 8 6

बालमटाकळीत शिवजयंती निमित्त व्याख्यान गावचा सरपंच होणे सोपे असते, परंतु पूर्ण गाव सांभाळणे इतके सोपे नाही, 

 

*अविनाश देशमुख शेवगाव :- 996बाबत सविस्तर वृत्त असे की लोकनियुक्त आदर्श सरपंच श्री भास्करराव पेरे शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हणाले की माणसे वळतात, त्यांना वळण लावायला शिका. घरातील म्हाताऱ्या माणसाशी प्रेम लाऊन बोला. त्यांचा सांभाळ करण्यातच खरी प्रतिभा आहे. इतर देशात वयाच्या शंभर वर्षापर्यंत जगून कामे करतात; परंतु आपल्याकडे दिवसेंदिवस आयुष्य कमी होत चालले आहे. याला कुठेतरी थांबायचे असेल, तर इतिहास वाचन, संतांचे विचार, दररोज स्वच्छ पाणी पिणे, मुलांना चांगले शिक्षण, संस्कार, गावात स्वच्छता, म्हाताऱ्या माणसांना जीव लावण्याबरोबर इतरांवर जळण्याची प्रवृत्ती बंद केल्यास निश्चित आयुष्य वाढवून आपण शंभर वर्षे पार करू शकतो, असे मत पाटोदाचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले. बालमटाकळी (ता. शेवगाव) येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे शनिवारी (ता. २२) सायंकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी शेवगाव बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे होते. पेरे म्हणाले, मेलेल्यांची राख नदीत टाकून पाणी खराब करू नका. त्याऐवजी काही खड्डे करून त्यात थोडी राख टाकून फळ झाडे लावा मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळेल पुढच्या पिढीला गोड रसाळ फळे मिळतील शंभर वर्षे जगण्यासाठी संतांचे विचार आवश्यक समाजात परिवर्तन करायचे असेल तर त्यासाठी साम, दाम, दंड, भेद देखील वापरावे लागते. सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायती चे सदस्य गावचे विठ्ठल- रुक्माई आहेत. जे इतरांसाठी जगतात त्यांचीच समाज नोंद घेतो, दुसऱ्यासाठी जगणाऱ्यांना समाज कधीच विसरत नाही.

झाडे लावून त्या झाडांना जगवा. त्याने स्मृतीही जपता येतील आणि निसर्गही जपता येईल.

यावेळी लोकनियुक्त सरपंच डॉ. राम बामदळे, ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक मोहनराव देशमुख, राहुल महाराज गरड, ऍड देविचंद पाटील, उपसरपंच सर्जेराव घोरपडे, ज्ञानेश्वरचे संचालक चंद्रकांत गरड, माझी सरपंच अशोक खिळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कासमभाई शेख, राजेंद्र देशमुख, मधुकर पाटेकर, विठ्ठल देशमुख, सत्तार शेख, भाऊसाहेब बामदळे आदी उपस्थित होते. यावेळी सामूहिक पसायदानाने शिवजयंतीच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

*अविनाश देशमुख शेवगांव*

*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

 

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे