महाराष्ट्र राज्याचा ,११ वा अर्थसंकल्प २०२५…. शेती व शेतकरी संदर्भीय उहापोह****कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे नेवासा””””
शेतकऱ्यांना आधुनिक शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नवीन योजना व त्यामध्ये किमान आधारभूत किमतीसाठी कायदेशीर संरक्षण देणे आवश्यक होते

.
नेवासा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचा ,११ वा अर्थसंकल्प २०२५…. शेती व शेतकरी संदर्भीय उहापोह****कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे नेवासा””””महाराष्ट्र राज्याच्या 11 व्या अर्थसंकल्पात शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञाना अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता चा कृषीक्षेत्रात वापर करण्याचे धोरण स्वागतहार्य आहे तसेच गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार यामुळे जमिनीचे आरोग्य व सुपीकता सुधारण्यास निश्चित मदत होईल असे वाटते. शेतीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक पाणी याकडे सरकारने लक्ष चांगले दिल्याचे आढळते. विशेषतः नदी जोड प्रकल्प आणि गोदावरी तुटीच्या खोऱ्यासाठी जायकवाडी मध्ये पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे नाशिक नगर विरुद्ध मराठवाडा हा वाद कमी होऊ शकतो व निश्चितच त्याचा शेतीला फायदा होईल देशी गाई संवर्धन व संगोपन यासाठी तरतूद केल्याबद्दल माननीय अर्थमंत्र्यांचे अभिनंदन तसेच बांबू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना केल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत. कृषी मालाच्या खरेदी विक्रीसाठी शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करण्याचे प्रयत्न होणार आहेत तथापि शेतकऱ्यांना आधुनिक शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नवीन योजना व त्यामध्ये किमान आधारभूत किमतीसाठी कायदेशीर संरक्षण देणे आवश्यक होते ती त्रुट आढळते शेत शेतमालाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत तथापि शेतमालाच्या स्वामीनाथन समितीप्रमाणे भाव मिळण्यासाठी यामध्ये तरतूद आढळून येत नाही वीज बिल माफ हा मुद्दा अतिशय चांगला असून सरसकट कर्जमाफी सुद्धा करणे काळाची गरज आहे भारतातील महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून तो कलंक पुसून टाकण्यासाठी उपाययोजना करणे अर्थसंकल्पात अपेक्षित होते तथापि तसे आढळत नाही कृषी क्षेत्रात निर्यातीसाठी चांगले धोरण घेतले आहे ते कायम व शाश्वत असावे म्हणजे शेतीच्या मालाला भाव वाढून मिळेल व शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील महाराष्ट्रातून कृषी निर्यातीला या सरकारने चालना देण्याच्या निर्णय चांगला घेतला आहे एकूण अकरावा अर्थसंकल्प शेतीसाठी मध्यम व उत्साह वाढवणारा आहे कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे नेवासा जिल्हा अहिल्यानगर