बनावट व एक्स्पायर कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करा; ‘केळी बागायतदार संघ’ आक्रमक
सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; बनावट औषधांमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त


बनावट व एक्स्पायर कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करा; ‘केळी बागायतदार संघ’ आक्रमक
सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; बनावट औषधांमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त
सांगली (विशेष प्रतिनिधी):
महाराष्ट्रातील, विशेषतः सांगली जिल्ह्यातील शेतकरी सध्या विविध पिकांवर होणाऱ्या रोग, कीड आणि विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. या गंभीर संकटामागील मुख्य कारण म्हणजे बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जाणारी डुप्लिकेट, बनावट आणि एक्स्पायर झालेली कीटकनाशके हेच आहे. अशा फसव्या कंपन्या आणि विक्रेत्यांवर तातडीने चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ‘केळी बागायतदार संघ, महाराष्ट्र राज्य’ (रजि.नं. महा.००१०१६/२०३४/पुणे) या संघटनेच्या वतीने सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत पत्राद्वारे (जा.क्र. /२०२५, दिनांक १०/१०/२०२५) करण्यात आली आहे.तसेच अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांना पण निवेदन दिलेले आहे


शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान
संघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या बाजारपेठेत अनेक पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड आणि फंगीसाईड आदी औषधांच्या नावाखाली अशुद्ध, कालबाह्य किंवा नकली औषधे उघडपणे विक्रीस ठेवली जात आहेत. या औषधांवर नामवंत कंपन्यांचे नाव व लेबल असले, तरी त्यांच्या आतल्या घटकांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट दर्जाची असते. परिणामी, शेतकऱ्यांनी या औषधांवर केलेला खर्च पूर्णपणे वाया जातो, पिकांचे उत्पादन घटते आणि शेवटी शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त होतो.
बनावट औषधांमुळे पिकांवर होणारे गंभीर परिणाम:
१) कीड नियंत्रणाचा परिणाम न होणे: महागडी औषधे मारूनही पिकांवरील कीड नष्ट होत नाही.
२) झाडांचे नुकसान: झाडांची पाने पिवळी पडणे, कोमेजणे किंवा वाळून जाणे असे प्रकार घडतात.
३) रोगांचा प्रादुर्भाव वाढणे: पिकांमध्ये फळकिड, मावा, थ्रिप्स, रॉट व इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढतो.
या गंभीर बाबीची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दोषी कंपन्या व विक्रेत्यांवर कडक मोहीम उघडावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मुख्य कार्यालय मांजरी (बु), पुणे व इंदापूर कार्यालय असलेल्या केळी बागायतदार संघाने दिला आहे.

निवेदन देणारे ‘केळी बागायतदार संघ’चे मुख्य पदाधिकारी व संचालक:
शेतकऱ्यांच्या या न्याय्य हक्कासाठी संघटनेच्या खालील सर्व प्रमुख पदाधिकारी व संचालक मंडळाने स्वाक्षरी व निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे:
डॉ. राहुल बच्छाव – पाटील (अध्यक्ष)
श्री. विजयसिंह गायकवाड (उपाध्यक्ष)
श्री. नामदेव वलेकर (सचिव)
श्री. नवनाथ जाधव (कार्याध्यक्ष)
श्री. सचिन गंगथडे (सहसचिव)
श्री. नरेंद्र काळे (राज्य प्रसिद्धी प्रमुख)
श्री. केतन पाटील (खानदेश विभाग प्रमुख)
श्री. संजय पाटील (खानदेश विभाग उपाध्यक्ष)
श्री. कन्हैया वसंत महाजन (खानदेश विभाग सचिव)
श्री. राजेश नवाल (खानदेश संपर्क प्रमुख)
श्री. उद्धव देशमुख (मराठवाडा विभाग अध्यक्ष)
श्री. गुलाबभाई पठाण (मराठवाडा विभाग सचिव)
श्री. रविंद्र डिगे (पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख)
श्री. कुबेर रेडे (संचालक)
श्री. बाळासाहेब पाटील (संचालक)





