ओसाड गावाचा पाटील”* *म्हणजेच शेतकरी संरक्षणाची जबाबदारी —* _कृषीमंत्री कोकाटे यांच्या विधानावर तज्ज्ञांचे भाष्य_
महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय नामदार माणिकराव कोकाटे* यांनी अलीकडेच केलेल्या एका *वक्तव्यामुळे राज्यातील कृषी वर्तुळात चर्चेचा धुमाकूळ* उडाला आहे. त्यांनी म्हटले की *, "कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावाचा पाटील".* त्यांच्या या वक्तव्यातून शेतकऱ्यांच्या सध्याच्या दुर्दशेचे आणि कृषी क्षेत्रातील समस्यांचे प्रतिबिंब दिसून येते, असा *अभिप्राय कृषी* *अभ्यासक डॉ. अशोकराव ढगे* यांनी व्यक्त केला.

*“ओसाड गावाचा पाटील”* *म्हणजेच शेतकरी संरक्षणाची जबाबदारी —* _कृषीमंत्री कोकाटे यांच्या विधानावर तज्ज्ञांचे भाष्य_
*नेवासा | प्रतिनिधी*
*महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय नामदार माणिकराव कोकाटे* यांनी अलीकडेच केलेल्या एका *वक्तव्यामुळे राज्यातील कृषी वर्तुळात चर्चेचा धुमाकूळ* उडाला आहे. त्यांनी म्हटले की *, “कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावाचा पाटील”.* त्यांच्या या वक्तव्यातून शेतकऱ्यांच्या सध्याच्या दुर्दशेचे आणि कृषी क्षेत्रातील समस्यांचे प्रतिबिंब दिसून येते, असा *अभिप्राय कृषी* *अभ्यासक डॉ. अशोकराव ढगे* यांनी व्यक्त केला.
भारत हा कृषिप्रधान देश आहे हे आता सर्वश्रुत झाले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि विकासाचा कणा कृषीच आहे हे सरकारपासून सामान्यांपर्यंत सर्वांनी मान्य केले आहे. तरीदेखील शेतकऱ्यांना अजूनही दररोज नवनवीन संकटांना सामोरे जावे लागत आहे.
वादळ, गारपीट, विजांचा कडकडाट, सर्पदंश, बिबट्याचे हल्ले, जंगली डुकरांचे उत्पात या सर्व नैसर्गिक व अनियंत्रित आपत्तींचा थेट फटका शेतकऱ्यांनाच बसतो. अन्य क्षेत्रांना संरक्षण पुरवणारे कायदे असताना शेतकऱ्यांसाठी मात्र असा कायदा अस्तित्वात नाही, ही खेदजनक बाब असल्याचे मत देखील या निमित्ताने अधोरेखित होत आहे.
*कृषीमंत्री कोकाटे* यांच्या वक्तव्यातून दिसून येते की, त्यांनी कृषी क्षेत्रातील ओसाडपणाची जाणीव मनोमन स्वीकारली आहे. ही भूमी ओसाड असली, तरी ती पुन्हा फुलवून सुजलाम सुफलाम करण्याचे भाग्य आणि जबाबदारी कृषी मंत्री म्हणून त्यांच्यावर आहे, हेही त्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे.
*डॉ. ढगे* म्हणतात की, *”कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावाचा पाटील”* हे विधान फक्त शब्दांचे खेळ नसून एक सामाजिक आणि आर्थिक वास्तवाचे भाष्य आहे. यातून शेतकऱ्यांच्या अडचणी, आत्महत्या, आणि दुर्लक्षिततेचेही दर्शन घडते. त्यांच्या या वाक्यातून उद्विग्नता आणि जबाबदारी दोन्ही झळकते.
शेतकऱ्यांना किमान हमीभाव देण्यासाठी कायदेशीर संरक्षण, शेतीस अनुकूल यंत्रणा, आणि शाश्वत विकासासाठी धोरणात्मक पावले उचलणे ही आता काळाची गरज बनली आहे. अन्यथा ‘ *ओसाड गावाचा पाटील’ ही उपमा तशीच* वास्तवात उतरलेली राहील.
कृषीमंत्री कोकाटे यांनी त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी नवीन योजना, सरलीकरण, व संरक्षण कायदा राबवण्याचे ठोस प्रयत्न करावेत अशी अपेक्षा राज्यभरातील शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.
—
*📝 बातमी | नरेंद्र पाटील काळे*
📍 खबरनामा न्यूज, नेवासा