Breaking
अहमदनगरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालनिवडणूकनेवासा तालुकाब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबईराजकियविमा कंपनीशेतकरी विरोधी कायदेशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यसंजय गांधी निराधार योजनासंवाद विधानसभास्वातंत्र्य दिन

शेतकरी संघटनेतर्फे राज्य उपाध्यक्ष अॅड अजित दादा काळे करणार नेवासा तालुक्यात उमेदवारी*

विधानसभा 2024 साठी नेवासा विधानसभा मतदारसंघातून शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजित दादा काळे हे निवडणूक लढविण्याची दाट शक्यता आहे .शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मेजर अशोक काळे यांनी सांगितले की नेवासा तालुक्यातून शेतकऱ्यांची असलेली प्रचंड मागणी ,

0 2 6 4 8 6

 

शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव

*शेतकरी संघटनेतर्फे राज्य उपाध्यक्ष अॅड अजित दादा काळे करणार नेवासा तालुक्यात उमेदवारी*

नेवासा – विधानसभा 2024 साठी नेवासा विधानसभा मतदारसंघातून शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजित दादा काळे हे निवडणूक लढविण्याची दाट शक्यता आहे .शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मेजर अशोक काळे यांनी सांगितले की नेवासा तालुक्यातून शेतकऱ्यांची असलेली प्रचंड मागणी , प्रस्थापित व विस्थापित आजी-माजी उमेदवारांना कंटाळलेली जनता आणि शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळण्याकरिता एडवोकेट अजित दादा काळे हे उमेदवारी निश्चित करणार असल्याचे संकेत आहेत .

नेवासे शहर व नेवासा ग्रामीण या दोन्हीही विभागांचा जर विचार केला तर नेवासा तालुका हा सर्वस्वी ग्रामीण अर्थव्यवस्थेतून तयार झालेला आहे आणि त्याचेच प्रतिबिंब नेवासा शहरावर आहे . सुमारे 114 गावे असलेला नेवासा तालुका संपूर्ण नगर जिल्ह्यात अत्यंत महत्त्वाचा समजला जातो .या तालुक्यातील जनतेने अनेक बदल वेळोवेळी केलेले आहेत .तरी देखील आज नेवासे शहराची अवस्था पाहता खूपच मागासलेला तालुका म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन जिल्ह्यामध्ये आहे .शहर म्हणून कोणतीही सुधारणा नेवासा तालुक्याला अद्यापपर्यंत मिळालेली नाही .औद्योगिक वसाहत निर्माण झालेली नाही चांगले रस्ते , स्वच्छ पाण्याची सुविधा अद्याप पर्यंत नागरिकांना मिळू शकलेल्या नाहीत .नेवासा तालुक्यात प्रचंड प्रमाणात ऊसाची उपलब्धता आहे .परंतु परिसरातील कारखान्यांच्या उदासीन धोरणांमुळे व सातत्याने उसाला कमी भावामुळे जनता हवालदील झालेली आहे .कृषी उत्पन्न बाजार समितीची अवस्था बघता तेथे शेतमाल कसा घेऊन जावा ही सुद्धा शेतकऱ्यांसमोर समस्या आहे . बाजार समितीच्या आवारात असणारी प्रचंड दलदल , दुर्गंधी व शेतकऱ्यांना असलेल्या सुविधेचा अभाव वारंवार दिसून येतो .शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावांवर नियंत्रण ठेवण्याचे काम सरकार करत असते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतमाल रास्त भाव विकला जाणे यावर लोकप्रतिनिधींचे अंकुश असणे गरजेचे असते . तालुक्यात सातत्याने लोकप्रतिनिधींमध्ये बदल झालेले आहेत परंतु आज पर्यंत कोणतेही भरीव कार्य शेतकरी ,शेतमजूर , व्यापारी अथवा छोटे उद्योजक यांच्याकरिता झालेले दिसून येत नाही .ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन नेवासा तालुका शेतकरी संघटना व शेतकरी एडवोकेट अजित दादा काळे यांच्या उमेदवारी करिता आग्रही आहेत .

एडवोकेट अजित दादा काळे यांनी नेवासे तालुक्यातील 2023 / 2024 खरीप पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत वंचित सोनई , चांदा ,कुकाना व नेवासे बुद्रुक या चारही मंडळांना कायदेशीर रित्या धाक प्रशासनास दाखवून शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळवून दिलेली आहे . पिक विमा मिळण्यास केवळ शासकीय दप्तर दिरंगाई झाल्यामुळे सदर पिक विमा रक्कम मिळू शकणार नव्हती .परंतु शेतकरी संघटनेने दिलेल्या कायदेशीर धड्यामुळे आज नेवासे तालुक्यातील आठही मंडळाना 82 कोटीची विमा रक्कम मिळू शकलेली आहे . सुमारे 443 शेतकऱ्यांचे 2022 चे एच डी एफ सी अर्गो कंपनीने बुडविलेले सुमारे 42 लाख 80 हजार 312 रु मिळविण्यात नेवासा तालुका शेतकरी संघटनेने अॅड अजितदादा काळे यांच्या नेतृत्वात यशस्वी झालेली आहे . त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी उपोषण , मोर्चे ,आंदोलन व प्रसंगी फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याने प्रशासन हैराण झाले व अखेरीस कंपनीला रक्कम देणे भाग पडले . अतिवृष्टी अनुदान आणण्यात देखील महत्वाचा वाटा संघटनेचा आहे . गोगलगाव येथील सुमारे 72 निराधार महिलाना शासकीय मदत देखील मिळवून दिली. मागील वर्षी नेवासा येथे लक्ष्मी मंगल कार्यालयात अजितदादांनी ऊस परिषद भरवून सर्व साखर सम्राटांना घाम फोडला . साखरे व्यतिरिक्त उपपदार्थाच्या उत्पन्नाचा पाढाच वाचून साखर सम्राटांना जेरीस आणले . त्यासाठी नेवासा फाटा येथे रास्ता रोकोचे आयोजन करून सरकारचे लक्ष वेधले . नेवासा तालुक्यातील वीज बिलापोटी शेतकऱ्यांच्या पंपांची वीज सरकारने तोडून सर्व ट्रान्सफॉर्मर बंद केले होते . त्यावेळी अजितदादांनी सदर वीज तोडणी हि बेकायदेशीर असून अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई चा बडगा उभारल्यावर महा वितरण खडबडून जागे झाले व अनधिकृत वसुली थांबवून तात्काळ वीज जोडणी क

 

अँड अजित दादा काळे

शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व शेतकऱ्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांच्या समस्या स्वर्गीय शरद जोशी साहेब व स्वर्गीय बबनराव काळे साहेब सातत्याने सरकार समोर मांडत आले .परंतु जोपर्यंत रास्त मागण्या विधिमंडळात अथवा संसदेत मांडणारे लोक जात नाहीत तोपर्यंत हे मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत .म्हणून नेवासा तालुक्यातील उमेदवारी करण्याचा निर्णय मी मनापासून घेतलेला आहे .

शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व शेतकऱ्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांच्या समस्या स्वर्गीय शरद जोशी साहेब व स्वर्गीय बबनराव काळे साहेब सातत्याने सरकार समोर मांडत आले .परंतु जोपर्यंत रास्त मागण्या विधिमंडळात अथवा संसदेत मांडणारे लोक जात नाहीत तोपर्यंत हे मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत .म्हणून नेवासा तालुक्यातील उमेदवारी करण्याचा निर्णय मी मनापासून घेतलेला आहे .

नेवासा तालुक्यातील अनेक खाजगी बॅका , पतसंस्था यांनी अव्वाच्या सव्वा चक्रवाढ व्याज दर लावून पठाणी वसुली चालु केली . त्यावर अजितदादांनी दाम दुपटीपेक्षा जास्त रक्कम खाजगी बॅका व पतसंस्थांना वसुल करता येत नाही हि कायदेशीर बाब निदर्शनास आणून तालुक्यातील सक्तीची वसुली थांबविली . तसेच मागील वर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने देखील सर्व शासकीय महसुली व बँक वसुली थांबविली .

याव्यतिरिक्त खिर्डी येथील श्री भाऊसाहेब पारखे या शेतकऱ्या प्रमाणे केवळ शासकीय पोर्टल बंद झाल्याने राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतील हजारो शेतकरी लाभातून मुकलेले होते . अजितदादांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात केवळ शासकीय पोर्टल बंद झाल्याने सदर शेतकरी मुकलेले आहेत व त्यांच्या प्रमाणेच हजारो शेतकरी मुकलेले आहेत हि बाब मा . उच्च न्यायालयाच्या लक्षात आणून दिली . त्यावर उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देवून एका शेतकऱ्याचा धागा पकडून राज्यातील सर्व वंचित शेतकऱ्यांना राज्य सरकारला सुमारे 5800 कोटी रुपयांची कर्जमाफी द्यावी लागली . श्रीरामपूर तालुक्यातील नऊ गावांचा शंभर वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेला अकारी पिडीत शेतकऱ्यांचा प्रश्न न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढून अजितदादांनी विजय मिळविला . अखेरीस सरकारला नऊ गावातील शेतकर्यांची 7500 हजार एकर जमिन परत करावी लागली . ह्या नऊ गावांची यंदा खऱ्या अर्थाने आनंदाची दिवाळी साजरी करत आहेत . याशिवाय जेथे राजकिय श्रेय घेण्याची चढाओढ निळवंडे लाभक्षेत्रात चाललेली आहे तेथे देखील निळवंडे कृती समिती स्थापन करून न्यायालयीन लढाई लढून अजितदादानी न्याय मिळवून दिला आहे व सर्व जनता हे जाणून आहे .

स्वर्गिय बबनराव काळे साहेबांनी शेतकऱ्यांकरीता आयुष्य वेचले व वडिलांच्याच पाऊलावर पाऊल अजितदादांनी ठेवले . त्यामुळे धनशक्ती पेक्षा वैचारिक शक्ती असलेला मतदार निश्चितपणे अजितदादांचा स्विकार करेल व नेवासा तालुक्याच्या समस्या प्रभावीपणे विधिमंडळात मांडल्या जातील हे निश्चित आहे

अॅड अजितदादांच्या उमेदवारीचे स्वागत जिल्हाध्यक्ष अनिल औताडे , जिल्हा उपाध्यक्ष हरि अप्पा तुवर , तालुकाध्यक मेजर अशोक काळे , युवाध्यक्ष डॉ रोहीत कुलकर्णी , बाबासाहेब नागोडे , नरेंद्र पा . काळे , अॅड बाळासाहेब कावळे , किरणदादा लंघे , सोमनाथ औटी , भास्कर तुवर, कैलास पवार , विश्वासराव मते , विजुभाऊ मते , सागर लांडे , दत्तात्रय पा . निकम आदिंसह सर्व शेतकरी व शहरातील व्यापारी यांनी केलेले आहे .

1.5/5 - (2 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे