सोयाबीन खरेदी- गलथान कारभार (व ड्रोन, विकास इंजिन, एआय च्या गप्पा)*
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात 'विकासाचे पहिले इंजिन कृषी क्षेत्र आहे'. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात 'कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) वापर करा'. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीप्रमाणे 'महाराष्ट्राचा दुष्काळ संपवणार' च्या थापा मारत आहेत. कृषीमंत्री ड्रोन चा वापर करायचा सल्ला देत आहेत.

*सोयाबीन खरेदी- गलथान कारभार (व ड्रोन, विकास इंजिन, एआय च्या गप्पा)*
नेवासा प्रतिनिधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात ‘विकासाचे पहिले इंजिन कृषी क्षेत्र आहे’. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात ‘कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) वापर करा’. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीप्रमाणे ‘महाराष्ट्राचा दुष्काळ संपवणार’ च्या थापा मारत आहेत. कृषीमंत्री ड्रोन चा वापर करायचा सल्ला देत आहेत.
*अबे, पहिले सोयाबीन खरेदीतील खालील गलथान कारभार थांबवा.* सोयाबीन एक प्रातीनिधिक पीक आहे. अशी बोंब प्रत्येक पिकाच्या बाबतीमध्ये आहे.
1) महाराष्ट्र राज्याला फक्त 14.13 लाख टन सोयाबीन खरेदीची परवानगी दिली आहे. अशी मर्यादा का?
2) त्यापैकी फक्त 10 लाख टना पर्यंत खरेदी झाली, तरी खरेदीला मुदतवाढ का नाही? *ही खरेदी राज्यातील एकूण 55 लाख टन उत्पादनाच्या फक्त 18.2% आहे*.
3) बारदाने शिल्लक नाहीत. वारंवार येणारा (Recurring Issue) प्रश्न. तरी उपाययोजना नाही.
4) भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) मध्ये माल साठवणुकीची क्षमता नाही. गोदामाच्या बाहेर सोयाबीन खाली करण्याच्या प्रतीक्षेत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.
5) इलेक्ट्रॉनिक वजन काट्याचा वापर करण्याचे निर्देश असताना त्याऐवजी खरेदी केंद्रामध्ये साधे काटे वापरून, *वजनामध्ये शेतकऱ्यांची लूट होत आहे.*
6) निवडणुकीच्या काळात 15 टक्के ओलाव्याचे निकषाचे आश्वासन/ परिपत्रक काढले होते. *ते खरेदी केंद्रापर्यंत आलेच नाही. त्यामुळे 12 टक्के ओलाव्याचे निकष गृहीत धरून माल नाकारला जात आहे*.
7) बऱ्याच शेतकऱ्यांनी एक जानेवारीच्या दरम्यान नोंदणी केली होती. तरी 31 जानेवारीला, मुदतीच्या *शेवटच्या दिवशी* सर्वांना एसएमएस प्राप्त झाले. एवढा उशीर का? त्यामुळे काही केंद्रावर तुफान गर्दी झाली.
8) सात-आठ दिवस रांगेमध्ये मोजणीच्या प्रतीक्षेत मुक्काम करावा लागल्यामुळे *टेम्पो -ट्रकचे भाडे कोण भरणार?*
9) काही शेतकऱ्यांची काही क्विंटलच सोयाबीन खरेदी केल्यानंतर उर्वरित सोयाबीन नाकारण्यात आले. त्यामुळे वाहतूक खर्च वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना स्थानिक व्यापाऱ्यांना कमी किंमतीत विकावे लागले. अशी मर्यादा का?
10) खरेदी केंद्रात शेतकऱ्यांकडून खरेदी न करता *व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्याचा भ्रष्टाचार कधी थांबणार?*
11) *सोयाबीन वरील वायदे बाजार बंदीला सेबी ने अजून दोन महिन्यांनी मुदतवाढ का दिली? आम्हाला पर्यायी मार्केट उपलब्ध का नाही?*
12) या भोंगळ कारभारामुळे सहा फेब्रुवारी मुदत असताना अजूनही खरेदी केंद्रावर रांगा आहेत.
13) राज्य सरकारने केंद्रीय कृषिमंत्रालयाकडे खरेदी ची मुदत वाढवण्यासाठी सहा तारखेला, दुपारी चार वाजता प्रस्ताव पाठवला. *इतके दिवस झोपले होते का?*
14) खरेदी केंद्रावर खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी व ग्रेडरची तटपुंजी कर्मचारी संख्या का आहे?
15) मालाची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून खरेदीदार *दीडशे रुपये प्रति क्विंटल मागणी करीत आहेत. यावर काय नियंत्रण आहे?*
16) *आठ हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला भाव मिळावा म्हणून आंदोलन करणारे आज सत्तेत आहेत. सध्या चार हजारच्या आत भाव मिळत आहेत.*
17) तेला वरील आयात कराला सुट दिली. त्याला मार्च 2025 पर्यंत वाढ दिली. त्यामुळे सोयाबीनचे भाव पडले आहेत. *परदेशातील शेतकरी तुमचे ‘लाडके’ आहेत का*?
18) राज्य सरकारने केंद्राला कळविलेली किंमत केंद्राने जाहीर केलेल्या एमएसपी पेक्षा 35 टक्क्यांनी जास्त होती. *त्यासाठी राज्य सरकार भावांतर योजना का आणत नाही?*
19) *आज नाफेड कडे शेतकऱ्यांचे 22.9 कोटी रुपयाचे चुकारे का प्रलंबित /थकीत आहेत?*
प्रत: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, पणन मंत्री, केंद्रीय कृषी मंत्री
सतीश देशमुख, B. E. (Mech).
अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स
9881495518
एकच ध्यास-शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास!