अखेर शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश : महाराष्ट्र शासनाकडून मा. बच्चूभाऊ कडूंना लेखी आश्वासन
महसूल मंत्री मा. वंदना (वंदनशेवर) प्रभाकर बवानकुळे यांनी दिनांक १४ जून २०२४ रोजी पाठवलेल्या पत्रात खालील आश्वासने देण्यात आली आहेत :

अखेर शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश : महाराष्ट्र शासनाकडून मा. बच्चूभाऊ कडूंना लेखी आश्वासन
नेवासा : शेतकरी कर्जमाफी व दिव्यांगांना मानधन वाढ देण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मा. बच्चूभाऊ कडू यांनी सुरू केलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना लेखी पत्र देत पुढील निर्णयांची हमी दिली आहे.
महसूल मंत्री मा. वंदना (वंदनशेवर) प्रभाकर बवानकुळे यांनी दिनांक १४ जून २०२४ रोजी पाठवलेल्या पत्रात खालील आश्वासने देण्यात आली आहेत :
1️⃣ शेतकरी कर्जमाफीसाठी १५ दिवसांत उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला जाईल. तसेच थकीत कर्जदारांविरोधातील वसुली स्थगित करण्यासाठी व नवीन कर्ज वाटपासाठी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल.
2️⃣ दिव्यांगांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव ३० जूनच्या पूर्वी अर्थसंकल्पात समाविष्ट केला जाईल.
3️⃣ वरील मागण्यांवर मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन अंतिम निर्णय काढण्यात येईल.
👉 Khabarnama News संपादकांनी घेतलेल्या शेतकऱ्यांच्या अभिप्रायानुसार शेतकरी बांधवांनी स्पष्ट मागणी केली आहे की,
“कर्जमाफीसाठी नवे निकष न ठरवता सरसकट कर्जमाफी दिली जावी. अनेकदा निकषामुळे खऱ्या अर्थाने गरजू शेतकरी वंचित राहतो. म्हणून सरसकट कर्जमाफीच खरी दिलासा देणारी ठरेल.”
शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी चालविलेल्या या संघर्षास शासनाकडून लेखी मान्यता मिळाल्यामुळे बच्चूभाऊ कडू यांनी समाधान व्यक्त केले असून, सरकारने दिलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे.
—
📝 बातमी : Khabarnama News (नेवासा)
संपादक : नरेंद्र पाटील काळे