अशोक कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत शेतकरी संघटनेच्या सभासदांचा बहिष्कार
25 ऑक्टोबर 2024 रोजी अशोक सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभाचे अजिंठे सभासदांना प्राप्त झाली आहेत परंतु शेतकरी संघटनेच्या वतीने सदर सभेत बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्वानुमते झाला आहे.
अशोक कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत शेतकरी संघटनेच्या सभासदांचा बहिष्कार
शिरसगाव (प्रतिनिधी)–
25 ऑक्टोबर 2024 रोजी अशोक सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभाचे अजिंठे सभासदांना प्राप्त झाली आहेत परंतु शेतकरी संघटनेच्या वतीने सदर सभेत बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्वानुमते झाला आहे. गेल्या 35 वर्षापासून अशोक कारखान्याची सर्वसाधारण सभा ही कारखाना कामकाज व ऊस दरावर न होता सातत्याने राजकीय खोटी चिकलफेक करून गुंडालळी जात आहे. अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत सभासदांनी गेल्या दहा वर्षापासून कारखान्याच्या चुकीच्या कामकाजाबाबत सातत्याने मुद्दे उपस्थित केले परंतु सदर प्रश्नांची उत्तरे देण्याचे दायित्व कारखान्याच्या व्यवस्थापनाने दाखविले नाही. आज रोजी राज्यातील जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश कारखाने 3500 च्या पुढे प्रति टन ऊस दर देताना दिसत आहे. परंतु अशोक सहकारी साखर कारखान्यांनी सातत्याने इतरांपेक्षा सातशे ते आठशे रुपये प्रति टन कमी दिले आहे. वास्तविक कारखान्याला सातत्याने गाळप क्षमतेपेक्षाही जास्तीचा ऊस 15 किलोमीटर अंतराच्या आत उपलब्ध आहे. परंतु जिल्ह्यातील इतर कारखान्यांना 60 टक्के कार्यक्षेत्र बाहेरून आणूनही जास्तीचे पैसे देता येतात. सभासद शेतकऱ्यांचा ऊस वेळेत तुटत नाही त्यामुळे बहुतांश शेतकरी गेल्या पाच वर्षापासून बाहेरील कारखान्यांना ऊस देत आहेत अशा सभासद शेतकऱ्यांना कारखान्याने मनमानी पद्धतीने अन्यविल्हेवाटीच्या नोटिसा काढून वेठीस धरले आहे. परंतु अशा नोटीसा काढतानी कारखाना व्यवस्थापनाने सातत्याने लाखो टन ऊस मार्फत बाहेर दिला आहे. ज्या कारखान्यांनी अशोक मार्फत ऊस घेतला अशा बाहेरील कारखान्यांनी अशोक पेक्षा पाचशे ते सहाशे रुपये जास्तीचे दिले आहे परंतु त्याचाही फायदा सभासदांना झाला नाही. आज रोजी अशोक कारखान्यावर पाचशे कोटीच्या आसपास कर्ज असल्याचे अहवालात दिसून येत आहे तसेच कारखान्याचा आज अखेर संचित तोटा 31 कोटी रुपये आहे या जबाबदार कोण असाही प्रश्न निर्माण होत आहे. कारखान्यावर असलेल्या कर्जाचा व तोट्याचा परिणाम ऊस दरावर होताना दिसत आहे कारखान्याने
जिल्हा बँकेकडून नाबार्डचे निकश डावलून गरज नसताना कर्ज घेतले. अशा कर्जाची परतफेड अशोक कारखान्यांच्या सभासदांना करावी लागत आहे उपपदार्थ निर्मितीचा लाभ सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होत नाही. वास्तविक कारखान्याला कार्यक्षेत्रात ऊस असल्यामुळे चार हजार रुपये भाव देणे शक्य आहे परंतु तो दिला जात नाही हे सभासदांचे दुर्दैव आहे. श्रीरामपूर तालुक्यातील जे राजकीय नेते तीस तीस वर्षे एकमेकांच्या विरोधात संघर्ष करत असताना दिसले असे असे नेते सत्ता मिळविण्यासाठी एकत्र आले इथेच ऊस उत्पादक सभासदांचा घात झाला शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हे सर्व चित्र उघड झाले. सहकारी साखर कारखाना, बाजार समिती व जिल्हा बँक या सहकारी संस्थांवर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून असलेले प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बाबत खोटी अस्मिता दाखवून फसवणूक करत आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीत कारखान्याने उस. बीलातून सक्तीची वसुली केली. तरी अशोक कारखाना व्यवस्थापनाने मागील वर्षाचे तीन हजार पाचशे रुपये पूर्ण करून पुढील वर्षाचा चार हजार रुपये प्रति टन दर द्यावा. कारखान्याला ऊस दराची स्पर्धा करावी लागेल तरच कारखान्याचे अस्तित्व टिकेल. आज रोजी अशोक कारखाना हा राहुरी व गणेश या कारखान्याच्या पेक्षाही परिस्थिती वाईट आहे अशोक कारखाना नेतृत्वाने सातत्याने राहुरी व गणेश ची तुलना केली .परंतु या दोन्ही कारखान्याच्या तुलनेत अशोक कारखान्यावर दुप्पट कर्ज झाले आहे हाही खुलासा अशोकचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांनी सभासदांना करावा. राहुरी तालुक्याच्या कार्यक्षेत्रात वीस ते पंचवीस लाख मॅट्रिक टन ऊस असूनही सदर संस्था सातत्याने कमी ऊस दर दिल्यामुळे ऊस उत्पादकांनी बाहेरील कारखान्यांना ऊस सातत्याने दिला .त्यामुळे ऊस असून देखील सभासदांनी कारखान्याला ऊस न दिल्यामुळे राहुरी कारखाना बंद पडला. राहुरी ची पुनरावृत्ती अशोकच्या व्यवस्थापनाने होऊ देऊ नये. अशोक कारखाना ही तालुक्याची कामधेनू आहे ती टिकली पाहिजे परंतु व्यवस्थापनाने कारखान्याच्या क्षमतेपेक्षा जास्तीचे कर्ज घेऊन कारखाना मोडीत काढण्याचे प्रयत्न होताना दिसत आहे. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील ऊस उत्पादकांना न्याय देण्यासाठी वेळ पडल्यास आम्ही रस्त्यावरील व कायदेशीर संघर्ष करणार आहोत. असे पत्रक शेतकरी संघटनेने काढले असून पत्रकावर जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तुवर, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप, डॉक्टर दादासाहेब आदिक, सुदामराव औताडे, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख तथा खिर्डीचे माजी लोकनियुक्त सरपंच प्रभाकर कांबळे, डॉक्टर विकास नवले, साहेबराव चोरमल, ऍड प्रशांत कापसे, शरद असणे, शरद पवार, बबनराव उघडे, इंद्रभान चोरमल, भास्कर तूवर, संदीप उघडे, गोविंदराव वाघ,अरुण मुठे, संजय वमने सागर गिऱ्हे, अनिल रोकडे, समीर रोकडे, ईश्वर दरंदले, कैलास पवार, सतीश नाईक, बबनराव नाईक, अहमद भाई शेख, दिलीप औताडे, योगेश्वर आदींच्या सह्या आहेत.