साखर कारखान्यांनी बायो प्रोडक्ट चे पैसे शेतकऱ्यांना न दिल्यास कारखान्यात धुराडे पेटू देणार नाही—शिवाजी नांदखेले
महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने ऊसाला कमी बाजार भाव देत असल्याचे त्यांनी शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांना त्या बैठकीत ध्यानात आणून दिले.
साखर कारखान्यांनी बायो प्रोडक्ट चे पैसे शेतकऱ्यांना न दिल्यास कारखान्यात धुराडे पेटू देणार नाही—शिवाजी नांदखेले
जुन्नर प्रतिनिधी
शेतकरी संघटनेचे नेते आणि क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष शिवाजी नांदखेले यांनी नुकती जुन्नर तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याबरोबर नारायणगाव या ठिकाणी शेतकऱ्याच्या अडचणीवर आणि ऊस दराबाबत चर्चा केली असता महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने ऊसाला कमी बाजार भाव देत असल्याचे त्यांनी शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांना त्या बैठकीत ध्यानात आणून दिले.
1960 पासून विचार केला असता प्रत्येक की दहा उसाचा बाजार भाव हा डबल होत गेलेला आहे बाकी परंतु 2014 ते 15 वर्षाच्या दरम्यान मागील भावाचा विचार केला असता आज उसाला किमान 5500 भाव इतका बाजार भाव मिळणे अपेक्षित असताना तो तीन हजार दोनशे इतका मिळालेला असून तो असमाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
नारायणगाव येथे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे महाराष्ट्र शेतकऱ्यांची वीज बिल माफ होण्यासाठी सातत्याने सरकार मागणी केल्यामुळे शेतकऱ्यांची कृषी पंपाचे वीज बिल माफ झाले त्यांनी सांगितले यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय भुजबळ, उपाध्यक्ष अजित वालझाडे, अजित वाघ ,अखिल भारतीय शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद खांडगे युवा आघाडीचे अध्यक्ष सचिन थोरवे, युवा उपाध्यक्ष मनोज शिंदे उपस्थित होते.