शेतकरी मेळावा आणि आंदोलनाची घोषणा —* *“कर्जमुक्ती व हमीभावाचा कायदा शेतकऱ्यांचा हक्कच” – विठ्ठल राजे पवार यांचा नाशिक जिल्हा बँक शासन प्रशासन व सरकारवर जोरदार हल्लाबोल..*
विठ्ठल राजे पवार यांचा नाशिक जिल्हा बँक शासन प्रशासन व सरकारवर जोरदार हल्लाबोल..*

*दिनांक – ०५ सप्टेंबर २०२५.
*शेतकरी मेळावा आणि आंदोलनाची घोषणा —* *“कर्जमुक्ती व हमीभावाचा कायदा शेतकऱ्यांचा हक्कच” – विठ्ठल राजे पवार यांचा नाशिक जिल्हा बँक शासन प्रशासन व सरकारवर जोरदार हल्लाबोल..*

*ओझर (नाशिक) दिनांक ५ सप्टेंबर २०२५.*
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार, शेतकऱ्यांची कर्जबाजारी स्थिती आणि शेतमालाला हमीभाव (MSP) या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर शेतकरी हक्क समितीच्या वतीने ओझर येथे दिनांक ३ व ४ सप्टेंबर २०२५ रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. शेतकरी संघटनेचे संस्थापक शेतकऱ्याचे पंचप्राण श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार महासंघ फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक श्री. विठ्ठल राजे पवार होते., ते पुढे बोलताना म्हणाले की जर सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना शेतमाल हमी भावापेक्षा कमी भाव देऊन उठत असेल तर दरवर्षी शेतकरी कर्ज मुक्तीची मागणी करतील त्याला सर्व प्रकारे राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार असेल असा कडवट इशारा देत शेतकऱ्यांना त्रास देत तुम्ही बेकायदेशीर कारवाई केल्यास राज्य आणि राष्ट्राची अन्नसुरक्षा धोक्यात येईल आणि त्याला सर्व प्रकारे राज्य आणि केंद्र सरकार शासन प्रशासन जबाबदार राहील असा कठोर इशारा देत सरकारवर हल्लाबोल केला आहे.
*यावेळी सर्व संघटनांच्या वतीने मुख्य घोषणा करण्यात आली की..*
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती व हमीभाव (MSP) संदर्भातील मागण्या मान्य न झाल्यास दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी लाखो शेतकरी माननीय लोकनायक नामदार बच्चू कडू साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मंत्रालयावर “हल्लाबोल आसूड मोर्चा” काढतील, असा इशारा या मेळाव्यात देण्यात आला., असा गंभीर इशारा या मेळाव्यात देत तुफान फटकेबाजी करताना विठ्ठल राजे पवार म्हणाले की यापुढे शेतकरी नाशिक जिल्हा बँकेचे किंवा सरकारचं कोणतेही देणे लागत नाही नाशिक जिल्हा बँकेने बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या जमिनीत जप्त करण्याच्या संदर्भात बोगस कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचे धाडस केल्यास संबंधितांवर देखील वैयक्तिक गुन्हे दाखल करून न्यायालयात खेचण्यात येईल असा गंभीर इशारा यावेळी देण्यात आला आहे ,सर्व शेतकरी संघटना व समविचारी पक्ष संघटनांनी २८ ऑक्टोबरच्या मुंबई मंत्रालया वरील शेतकरी हक्क आसूड मोर्चा आंदोलनात सहभागी व्हावे असे जाहीर आव्हान राजे पवार यांनी यावेळी केले.
*सर्व संघटनांच्या वतीने ⚖️ महत्त्वाच्या कायदेशीर मागण्या करण्यात आल्या त्या खालील प्रमाणे..*
1️⃣ नाशिक जिल्हा बँकेतील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजना यामधील ₹१७०० से कोटींहून अधिक आर्थिक गैरव्यवहाराची इओडब्लू, इडी चे माध्यमातून सखोल चौकशी ,दोषींवर EOW व ED मार्फत कठोर कारवाई करावी. त्या गैर व्यवारातील दोषी लोकप्रतिनिधी, संचालक, मंडळ , बँक कर्मचारी किंवा इतर संबंधितांवरही महाराष्ट्र सहकारी संस्था १९६० अधिनियम ८८ अन्वये कठोर कारवाई करावी.
2️⃣ नाशिक जिल्हा बँकेचे तत्कालीन संचालक मंडळाने ३७५ अनैतिक कामगार भरती व आर्थिक फसवणूक प्रकरणी, IPC अॕक्ट व महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कलम 88 अंतर्गत गुन्हे नोंदवून कारवाई करावी.
3️⃣ बेकायदेशीर बिगरशेती कर्ज व ठेवी परताव्या चे गैरव्यवहारातील दोषी तत्कालीन संचालक मंडळ बँकेचे अधिकारी यांचे मालमत्ता व सदर बाबत, ED मार्फत चौकशी व दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करावी.
4️⃣ राज्यातील सर्व गरजवंत पीछडावर्ग शेतकरी कर्जमुक्ती व हमी भावाचा गॅरंटी बेस रेट कायदा
सर्व शेतकऱ्यांचे थकीत कर्ज तातडीने माफ करावे.
सर्व शेती उत्पादनांना बेसरेट/हमीभाव देणारा कायदा केंद्र व राज्य सरकारने करावा.
5️⃣ शेतकरी आत्महत्या – सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
नाशिक बँक, महसूल व सहकार विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर चुकीच्या सक्तीच्या वसुलीमुळे झालेल्या शेतकरी आत्महत्यांबाबत सदोष मनुष्यवध गुन्हा दाखल करण्यात यावा व संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
ठराव (४ सप्टेंबर २०२५ रोजीच्या समारोप सभेत पारित):
राज्य व केंद्र सरकारने तात्काळ संपूर्ण शेतकरी कर्जमुक्ती जाहीर करावी.
शेतमालाला गॅरंटी एमएसपी बेसरेट देण्यासाठी कायदा करावा.
कृषी किंमत न्यायाधिकरण स्थापन करावे.
शेतकऱ्यांच्या वादासाठी स्वतंत्र कृषी न्यायालये स्थापन करावीत.
ऊस उत्पादक शेतकरी महामंडळ, दूध उत्पादक शेतकरी महामंडळ, व शेतमजूर कष्टकरी कामगार विकास महामंडळ तातडीने स्थापन करावे.
नाशिक जिल्हा बँकेने चुकीच्या पद्धतीने कर्जदार शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर केलेल्या नोंदी पूर्ववत कराव्यात.
बँक वसुलीतील पठाणी कारवाई तात्काळ थांबवावी.
यावेळी मेळाव्यात उपस्थित मान्यवर, कार्यक्रमाचे आयोजक भगवान बोरसे, कैलास बोराडे, अॅड. दिलीप पाटील, व प्रमुख वक्ते माननीय विठ्ठल राजे पवार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते तर यावेळी इंजि. सतीश देशमुख, अॅड. श्रीकांत पाटील, धनंजय काकडे देशमुख (अमरावती), सुधाकर मोगल, अनिता कोल्हे (महिला आघाडी), शिवराम पाटील (जळगाव), डॉ. शाम अष्टेकर, डॉ. प्रवीण कुमार राऊत अमरावती, श्रीकांत तराळ (वरिष्ठ पत्रकार), मोतीराम त्र्यंबक पाटील वरिष्ठ शेतकरी नेते), तसेच शेतकरी, कामगार, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*यावेळी बोलताना विठ्ठल राजे पवार यांनी अत्यंत महत्वाचे आवाहन केले ते म्हणाले की,*
*“राज्य व केंद्र सरकारने तात्काळ शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून कर्जमुक्ती व हमीभाव कायदा करावा. अन्यथा शेतकऱ्यांचा संघर्ष अधिक तीव्र होईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी राज्य व केंद्र सरकारवर असेल असा कठोर इशारा विठ्ठलराजे पवार यांनी यावेळी दिला आहे.”
*विठ्ठल राजे पवार*
*अध्यक्ष तथा निमंत्रक
*शरदजोशी विचारमंच शेतकरी कामगार एम एस फाऊंडेशन शेतकरी संघटना महासंघ नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य.
भगवान बोरसे
कार्यक्रमाचे आयोजक नाशिक
दिनांक – ०४५सप्टेंबर २०२५, स्थळ – ओझर, नाशिक




