खरीप हंगाम 2024 पीकविमा तक्रार निवारण कॅम्प उत्स्फूर्त! – हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती, नुकसान भरपाईबाबत ठाम मागणी
स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना व महिला आघाडी (अहिल्यानगर) यांच्या वतीने खरीप हंगाम 2024 मधील पीकविमा नुकसान भरपाईबाबत तक्रारींचे निवारण करण्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या श्रीरामपूर कार्यालयात तक्रार निवारण कॅम्प आयोजित करण्यात आला. या कॅम्पला श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे 2,500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

📰 खबरनामा न्यूज
📍 श्रीरामपूर तालुका – दि. 1 जुलै 2025
खरीप हंगाम 2024 पीकविमा तक्रार निवारण कॅम्प उत्स्फूर्त! – हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती, नुकसान भरपाईबाबत ठाम मागणी
श्रीरामपूर प्रतिनिधी :-स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना व महिला आघाडी (अहिल्यानगर) यांच्या वतीने खरीप हंगाम 2024 मधील पीकविमा नुकसान भरपाईबाबत तक्रारींचे निवारण करण्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या श्रीरामपूर कार्यालयात तक्रार निवारण कॅम्प आयोजित करण्यात आला. या कॅम्पला श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे 2,500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी, कागदपत्रे सादर करत विमा भरपाई मिळवण्यासाठी मागणी नोंदवली. श्रीरामपूर तालुक्याला 4 पैकी 2 निकषांनुसार (1) स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि (2) काढणी पश्चात नुकसान यासाठी भरपाई मंजूर करण्यात आली आहे. मात्र, केवळ स्थानिक आपत्तीच्या भरपाईस काही शेतकऱ्यांना रक्कम मिळाली असून काढणी पश्चात नुकसान भरपाई अजूनही थकली आहे.
🔹 नगर जिल्ह्यात सुमारे 10 कोटींची नुकसान भरपाई रखडली
तालुक्यातील सुमारे 2 हजार शेतकऱ्यांना 2 कोटींपेक्षा अधिक, तर संपूर्ण नगर जिल्ह्यात 10 कोटींपेक्षा जास्त भरपाईची रक्कम विमा कंपनीकडून मिळणे बाकी आहे. अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी 72 तासांत नोंद न झाल्यामुळे फेटाळल्या गेल्या, काहींच्या तक्रारी चुकीच्या कारणाने नाकारल्या, तर काहींना टोल फ्री क्रमांक सतत व्यस्त असल्यामुळे संपर्क साधता आला नाही.
> “एकाच गट नंबरमधील काहींना भरपाई मिळते आणि इतरांना नाकारली जाते, हे अन्यायकारक आहे. शासनाने 72 तासांची अट शिथिल करावी!”
– स्वतंत्र भारत पक्ष
🔹 विमा कंपन्यांना शासनाचे 1400 कोटी थकीत
विमा कंपनी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, शासनाने विमा कंपन्यांकडे देय असलेली 1400 कोटी रुपयांची रक्कम भरल्याशिवाय काढणी पश्चात नुकसानभरपाई दिली जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने ही रक्कम तातडीने भरावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
👥 उपस्थित मान्यवर –
या कॅम्पमध्ये स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. सुनीताताई वानखेडे, तालुकाध्यक्ष सौ. कोमल वानखेडे, उपाध्यक्ष नवनाथ दिघे, अंबादास गमे, अशोक आव्हाड यांच्यासह ओरिएंटल इन्शुरन्सचे श्रीरामपूर अधिकारी स्वप्नील मोकळ, अस्लम सय्यद उपस्थित होते.
तक्रार निवारण कॅम्प यशस्वी होण्यासाठी कृषी अधिकारी श्री. उल्हास राक्षे यांचे विशेष सहकार्य लाभले.
—
📌 खबरनामा न्यूज | शेतकऱ्याचा आवाज, सत्याचा पत्रकारिता मंच




