Breaking
ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनकृषी कायदाकृषी मूल्य आयोगकृषीवार्ताकेंद्र सरकार आयात निर्यात धोरणकेंद्रीय कृषिमंत्रीतहसीलदार नेवासानेवासापोलीस निरीक्षक कार्यालय अहिल्यानगरब्रेकिंगमहसूल मंत्री व महसूल विभागमहाराष्ट्रमहाराष्ट्र शासन कर्ज माफीमाननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्यमानवाधिकार सुरक्षा फेडरेशन महाराष्ट्र राज्यसंवाद विधानसभाहमीभाव

स्वामीनाथन आयोग तात्काळ लागू करा — नरेंन्द्र काळे* 

अन्यथा शेती, शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात

0 6 0 6 2 3

स्वामीनाथन आयोग तात्काळ लागू करा — नरेंन्द्र काळे* 

 अन्यथा शेती, शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात

 

 *नेवासा | प्रतिनिधी* 

महाराष्ट्रासह देशातील शेतकरी आज गंभीर आर्थिक, सामाजिक व मानसिक संकटातून जात असून उत्पादन खर्च प्रचंड वाढूनही शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी तोट्यात शेती करत आहे. परिणामी कर्जबाजारीपणा वाढत असून शेती व्यवसायाचा ऱ्हास होत आहे व आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी हितसंरक्षणासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात, अशी राज्यव्यापी मागणी किसान श्रमिक जनशक्ती युनियन – महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या सन्माननीय जगण्याचा हक्क सुरक्षित करण्यासाठी संघटनेने शासनास सादर केलेल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. शेती उत्पादनाचा संपूर्ण खर्च *(C2)* धरून त्यावर *५०* टक्के नफा जोडून *MSP = C2 +* *50%* या सूत्रानुसार कायदेशीर हमीभाव जाहीर करावा. गावपातळीवर हमी खरेदी केंद्रे सुरू करून सर्व पिकांची हमी खरेदी करावी व शेतकऱ्यांना तत्काळ ऑनलाइन पेमेंट द्यावे. जिल्हानिहाय उत्पादन खर्च मोजणीसाठी राज्य कृषी दर आयोग स्थापन करावा. खासगी सावकार कर्जाचा समावेश करून कर्जमुक्ती योजना राबवावी तसेच व्याजमुक्त किंवा अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करावा.

यासोबतच पीक विमा योजनेत सुधारणा करून ३० दिवसांच्या आत नुकसान भरपाई द्यावी, गावपातळी पंचनामे करावेत व विमा कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करावी. शेतीला उद्योगाचा दर्जा देऊन वीज, पाणी, प्रक्रिया उद्योग व निर्यात साखळी सवलती द्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.

शेतकरी संघटना व शासन यांची तातडीने संयुक्त बैठक घेऊन उत्पादन खर्च सादरीकरण, *MSP* तफावत विश्लेषण, आत्महत्या कारणमीमांसा व बाजार व्यवस्थेतील त्रुटींवर ठोस निर्णय घ्यावेत, अशी भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे. शासन आर्थिक भार, साठवणूक व बाजार स्पर्धा यांसारखी कारणे पुढे करत असले तरी शेतकरी वाचवणे ही राष्ट्र अर्थव्यवस्थेची प्राथमिक अट असून आयोगाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.

 *गंभीर इशारा* 

स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी तातडीने झाली नाही तर शेतकरी आत्महत्या वाढतील, शेती देशोधडीला लागेल, तरुण पिढी शेतीपासून दूर जाईल, कर्जाचा डोंगर वाढेल व ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडेल, असा इशारा देण्यात आला आहे. भविष्यात शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत तर “ही व्यवस्थात्मक मनुष्यवधाची स्थिती आहे का?” असा संतप्त सवाल समाजमनातून उपस्थित होऊ शकतो, ही बाब शासनाने गांभीर्याने घ्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे.

मात्र संघर्षापेक्षा संवादातून प्रश्न सोडवण्याची भूमिका मांडत शासनाने तात्काळ संयुक्त बैठक बोलवून सकारात्मक निर्णय घ्यावा व आंदोलनाची वेळ येऊ न देता आयोगाची अंमलबजावणी करावी, अशी नम्र पण ठाम विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांना ई-मेल पाठवला आणि मागणी केली

 

नरेंद्र वारणाथ काळे

उपाध्यक्ष

किसान श्रमिक जनशक्ती युनियन – महाराष्ट्र राज्य

दिनांक : १२ फेब्रुवारी २०२६

ठिकाण : नेवासा, अहिल्यनगर

☎️ संपर्क : ९७३०४५७००७

“शेतकरी वाचला तर देश वाचेल”

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 6 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे