Breaking
अँटी करप्शन ब्युरो अहिलेनगरअर्थसंकल्प केंद्र सरकारअहमदनगरआत्महत्याग्रस्त शेतकरीआरबीआय धोरण भारत सरकारआरबीआयचे नवीन पद धोरणआरोग्य व शिक्षणआरोग्य विभाग महाराष्ट्र शासनई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनकृषी उत्पन्न बाजार समितीकृषी कायदाकृषी सन्मान पुरस्कारकृषीवार्तादेश-विदेशपंचनामापुरस्कारब्रेकिंग

*डॉ. मुकुंदराव गायकवाड यांचा शेतकरी संघटनेत प्रवेश;* _अहिल्यानगरमध्ये शेतकरी संरक्षण कायद्यावर लक्षवेधी बैठक_ 

सावेडी परिसरातील अहिल्यानगर येथे शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक ८ जून रोजी एक लक्षवेधी बैठक संपन्न झाली. या बैठकीत शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देणाऱ्या "शेतकरी संरक्षण कायदा" तयार करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या वेळी ज्येष्ठ कृषी वैज्ञानिक डॉ. मुकुंदराव गायकवाड यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.

0 2 6 4 8 9

*डॉ. मुकुंदराव गायकवाड यांचा शेतकरी संघटनेत प्रवेश;* _अहिल्यानगरमध्ये शेतकरी संरक्षण कायद्यावर लक्षवेधी बैठक_ 

*अहिल्यानगर, ८ जून २०२५ (खबरनामा न्यूज) –* सावेडी परिसरातील अहिल्यानगर येथे शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक ८ जून रोजी एक लक्षवेधी बैठक संपन्न झाली. या बैठकीत शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देणाऱ्या “शेतकरी संरक्षण कायदा” तयार करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या वेळी ज्येष्ठ कृषी वैज्ञानिक डॉ. मुकुंदराव गायकवाड यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.

डॉ. गायकवाड यांचा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष व नामवंत कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. अजितराव काळे (संभाजीनगर हायकोर्ट) यांच्या हस्ते संघटनेचा सन्मानचिन्ह बिल्ला लावून विशेष सन्मान करण्यात आला. शेतकऱ्यांसाठी न्याय मिळवून देणे आणि शेतकरी संरक्षण कायद्याचा मसुदा तयार करून कायद्यात रूपांतर घडवणे, यासाठी आपण वेळ व ज्ञान खर्च करू असे आश्वासन डॉ. गायकवाड यांनी दिले.

 *या बैठकीत पुढील मान्यवर उपस्थित होते:* 

प्रा. अशोकराव सब्बन संबंध – भारतीय जनसंसदेचे राज्याध्यक्ष

अ‍ॅड. कारभारी गवळी – ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ

सरपंच सरक – डोंगरगण

हुकूम बाबा नवले – बाबुळ खेड्याचे प्रगतशील शेतकरी

केशवराव लोखंडे – शेती व्यवसायिक

वीर बहादूर प्रजापती – सामाजिक कार्यकर्ते

सुधीर भद्रे – भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष

कैलास पठारे – शेतकरी नेते

या बैठकीत प्रा. अशोकराव ढगे यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या “शेतकरी संरक्षण कायदा मसुदा” यावर चर्चा झाली असून, लवकरच अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय मंथन परिषद घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या परिषदेत विविध जिल्ह्यांतील शेतकरी प्रतिनिधी, कायदेतज्ज्ञ, आणि संघटनेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

या ऐतिहासिक बैठकीमुळे शेतकरी संघटनेच्या कार्याला वैज्ञानिक व कायदेशीर बळ मिळाल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून संरक्षण, हमीभावाची कायदेशीर हमी, व शेतमालाच्या बाजारात पारदर्शकता मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला

*🖊️ रिपोर्ट:* नरेंद्र पाटील काळे | खबरनमा न्यूज, नेवासा

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 6 4 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे