विठ्ठल विठ्ठल जय हरी… घाट चढती वारकरी, नामस्मरण त्यांचे ओठी 🔸*
नेवासा ते पंढरपूर ३० दिंड्यांचा ऐतिहासिक प्रस्थान सोहळा उत्साहात पार

*विठ्ठल विठ्ठल जय हरी… घाट चढती वारकरी, नामस्मरण त्यांचे ओठी 🔸*
नेवासा ते पंढरपूर ३० दिंड्यांचा ऐतिहासिक प्रस्थान सोहळा उत्साहात पार
नेवासा – नेवासा नगरीतून पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या ३० दिंड्यांचा ऐतिहासिक प्रस्थान सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने निघालेली वारकऱ्यांची पालखी तिसऱ्या दिवशी पंढरी पुलापर्यंत पोहोचली. शिंगवे तुकाई येथील मुक्कामानंतर घाट चढत असताना टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी’ च्या घोषात संपूर्ण घाट भक्तिरसात न्हालेला दिसून आला.
वारकरी संप्रदायाचे प्रेम आणि निष्ठा याचा प्रत्यय येत होता. ‘ऊन-पावसाची पर्वा न करता पांडुरंगाच्या भेटीची आस’ अशी भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. वयोवृद्ध, तरुण, महिला आणि लहान मुलांनी मिळून हा कठीण घाट पार करत असताना त्यांचा उत्साह आणि पांडुरंगा वरची श्रद्धा डोळ्यांत भरत होती.
पंढरीच्या दिशेने वाटचाल करताना नामस्मरणाचा अखंड ध्यास आणि सामूहिक हरिपाठ यामुळे हा धार्मिक प्रवास भक्ति पथावर चालणारा एक महान सामाजिक आणि अध्यात्मिक सोहळा ठरतो आहे. घाट चढताना झालेल्या टाळ-मृदंगाच्या गजराने परिसर भक्तिमय झाला होता.
— बातमी : नरेंद्र पाटील काळे, खबरनामा न्यूज, नेवासा