नेवासे तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचे पिक विमा करिता आमरण उपोषण सुरू
कृषी विभाग व पोलीस निरीक्षक जोपर्यंत विमा कंपनीवर गुन्हा नोंदवत नाही तोपर्यंत शेतकरी संघटना विधीतज्ञ अजित काळे यांच्या अध्यक्षतेखाली आमरण उपोषण चालू ठेवणार
नेवासा (प्रतिनिधी ) नेवासा तहसील कार्यालय समोर खरीप 2023 -24 पंतप्रधान पिक विमा अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना अद्यापही विमा रक्कम न मिळाल्या कारणाने शेतकरी संघटनेने उपोषण चालू केलेले आहे .नेवासे तालुक्यातील आठ मंडळा पैकी चार मंडळांना 25% आगरी विमा मिळाला परंतु चार मंडळे वंचित राहिली .त्यानंतर सर्व मंडळांना जानेवारी 2024 पर्यंत विमा रक्कम प्राप्त होईल असे कृषी अधिकारी सांगत राहिले .वास्तविक पणे वेळेत नोटिफिकेशन न दिल्यामुळे म्हणजेच दप्तर दिरंगाई मुळे चारही मंडळे 25% आगरी विम्या पासून वंचित राहिलेली होती .त्यानंतर 12 ऑगस्ट 2023 ते 6 सप्टेंबर 2023 या कालखंडामध्ये आवश्यक काल आल्याने म्हणजेच थोडासुद्धा पाऊस न झाल्या काढण्याने 21 दिवसापेक्षा जास्त कालखंड पाऊस नसताना झाला .त्यातही प्रथमतः कंपनीने ज्यांच्या ऑनलाईन तक्रारी आहेत त्यांचेच विमा रक्कम मिळतील असा पवित्र घेतला .परंतु शेतकरी संघटनेच्या अथक प्रयत्नांनी सर्व शेतकऱ्यांना विम्यास लाभार्थी पात्र बनवण्यात आले .कारण बहुतांशी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रेंज नसते अनेक शेतकरी ऑनलाईन निरक्षर असतात याचा फायदा कंपनी घेऊ पाहत होती .परंतु आता केंद्र सरकारचा 99 कोटी व राज्य सरकारचा 2017 कोटी निधी न आल्याकारणाने आम्ही विमा देऊ शकत नाही असे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी सांगत आहे .त्या विरोधात शेतकरी संघटनेने राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजित दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाचे हत्यार उपसले आहे .
तसेच 2022 2023 खरीप पिक विमा योजनेअंतर्गत एचडीएफसी आरगो कंपनीकडून नेवासे तालुक्यात सुमारे 40 लाख रुपयांची रक्कम बाऊन्स झालेली आहे .त्या संदर्भात शेतकरी संघटनेने कृषी अधिकारी तथा तहसील कार्यालय आणि एचडीएफसी आरगो कंपनी यांच्याकडे अनेक महिन्यांपासून मागोवा घेतला .परंतु या तीनही व्यवस्थापकांकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली .शेवटी संघटनेने या कंपनी विरोधात एफ आय आर दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे . ‘परंतु पी एफ आय आर दाखल करून घेण्यास नेवासा तालुका पोलीस स्टेशन अनेक दिवसांपासून टाळाटाळ करीत आहे असे दिसून आलेले आहे .
यासंदर्भात शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजित दादा काळे यांनी कठोर भूमिका घेतलेली आहे .त्यामुळे जोपर्यंत सदर कंपनी विरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे ठामपणे सांगण्यात आलेले आहे .पोलीस अधिकाऱ्यांनी मात्र त्वरित कार्यवाही करू असे आश्वासन दिलेले आहे परंतु शेतकरी संघटनेचे समाधान जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत होणार नाही असे सांगण्यात आलेले आहे .एडवोकेट अजितदादा काळे यांनी एचडीएफसी आरगो कंपनी व ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी या दोन्ही कंपनीला उच्च न्यायालयात खेचण्याचा इशारा दिलेला आहे .त्याचप्रमाणे लवकरात लवकर केंद्र व राज्य शासनाचा निधी उपलब्ध न झाल्यास शासन स्तरावर देखील शेतकरी संघटना दबाव निर्माण करणार आहे असे त्यांनी सांगितले .
तसेच जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांनी विमा कंपनी शासनाने जर ब्लॅक लिस्टमध्ये टाकली तर शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे बुडवायचे का असा सवाल केला .
या प्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे,उप जिल्हाध्यक्ष हरि अप्पा तुवर , तालुकाध्यक्ष मेजर अशोक काळे, युवा अध्यक्ष डॉ रोहित कुलकर्णी , तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष युवराज पा . जगताप, नरेंद्र पा . काळे ( संपर्कप्रमुख ), शरद आसने ,भास्करराव तूवर,किरण दादा लंघे ,विश्वासराव मते,एडवोकेट बाळासाहेब कावळे,श्री प्रकाश जाधव,श्री साहेबराव पवार,सोमनाथ औटी ,एडवोकेट पांडुरंग औताडे दत्तात्रय पा . निकम सुरेगावचे सरपंच श्री शिंदे पा .आदींसह मोठा शेतकरी वर्ग उपस्थित होता .